नागरी सेवा परीक्षेची रचना कशी असावी त्याबद्दल थोडेसे मार्गदर्शन.

   

    एकदा कर्तुत्व सिद्ध झाले की, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप झुकतात. एकच मोठा विजय तुमचे सर्व प्रभाव पुसून टाकतो. परंतु, यासाठी तुम्हाला समर्पणासह सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. जशी हि आपल्या करिअरची एक महत्वपूर्ण स्पर्धा असते, तशीच तिला जीवनातील महत्वपूर्ण व चांगल्या सवयींची स्पर्धा सुद्धा म्हणता येईल.

नागरी सेवा परीक्षांमध्ये असलेल्या गतीशिलतेला समांतर गतिशीलता स्पर्धा परीक्षार्थ्यांनी स्वतः मध्ये निर्माण केल्यास यशप्राप्तीसाठी उपयुक्त ठरेल. 

स्पर्धा परीक्षा मराठी - YouTube

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

विविध संस्थांमार्फत निःशुल्क मार्गदर्शन :-

    ‘बार्टी’ संस्थेद्वारे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्थेबरोबर मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थांसाठी आणि ‘महाज्योती’ संस्थेद्वारे इतर मागासवर्गीय समाजातील (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप दिली जाते आणि प्रशिक्षणाची व्यवस्थाही केली जाते. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या SAIC या संस्थेद्वारे मुंबईसह इतर जिल्ह्यातही निःशुल्क प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. याविषयी इच्छुक विद्यार्थ्यांनी आधीच माहिती मिळविणे अपेक्षित असते.

यासंबंधी सविस्तर माहिती – 

www.sarthi-maharashtra.gov.in

www.mahajyoti.org.in

SAIC (State Institute for Administrative Careers)

या वेबसाईट वर क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता.

 परीक्षेची रचना :-

युपीएससीद्वारे घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. 
  
पूर्व परीक्षा:- 

पेपर्स                       प्रश्न संख्या                गुण               वेळ

सामान्य अध्ययन        १००                      २००             २ तास

नागरी सेवा नैसर्गिक     ८०                        २००             २ तास 

चाचणी (CSAT):-

नागरी सेवा नैसर्गिक क्षमता / कौशल्य चाचणी (CSAT) हा दुसरा पेपर केवळ पात्रता पेपर असतो. वजा गुण पद्धतीचा येथे अवलंब केला जातो. म्हणून परीक्षार्थ्याने अभ्यास करताना बेसिक चांगल्या पद्धतीने आत्मसात करायला हवे. पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपरमधील गुणानुसार पदसंख्येच्या प्रमाणात कट ऑफ जाहीर केला जातो. पूर्व परीक्षा हि वस्तुनिष्ठ स्वरुपाची असते. मुख्य परीक्षेला पात्र ठरविण्यासाठी या परीक्षेचा उपयोग होतो. अंतिम यादी हि मुख्य परीक्षा आणि मुलाखत या गुणावरून ठरते. 

मुख्य परीक्षा :-

    मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची असते. आयोगाने मुख्य परीक्षेसाठी १७५० गुण निर्धारित केले आहेत. अनिवार्य इंग्रजी (३०० गुण) आणि अनिवार्य भारतीय भाषा (३०० गुण) अशा एकूण ६०० गुणांचा समावेश ११७५० मध्ये होत नाही. मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन (१००० गुण), वैकल्पिक विषय (५०० गुण), निबंध (२५० गुण), याशिवाय अनिवार्य इंग्रजी (३०० गुण) आणि अनिवार्य भारतीय भाषा (३०० गुण) हे भाषेचे दोन विषय पात्रतेच्या स्वरुपात समाविष्ट असतात. 

मुख्य परीक्षेचे स्वरूप :-

पेपर

गुण

वेळ

अनिवार्य इंग्रजी

३००

३ तास

भारतीय भाषा

३००

३ तास

निबंध

२५०

३ तास

सामान्य अध्ययन – १

२५०

३ तास

सामान्य अध्ययन – २

२५०

३ तास

सामान्य अध्ययन – ३

२५०

३ तास

सामान्य अध्ययन – ४

२५०

३ तास

वैकल्पिक विषय पेपर १

२५०

३ तास

वैकल्पिक विषय पेपर २

२५०

३ तास

 टीप:- अनिवार्य इंग्रजी व भाषेचा पेपर या दोन्ही विषयांचे पेपर्स पात्रता (Qualifying) पेपर आहेत.

    गुणाक्रमात अव्वल येण्यासाठी खरा अभ्यास सुरु होतो तो निबंधाच्या पेपरपासूनच. आयोगाने यास २५० गुण निर्धारित केलेले असतात. आयोगाने दिलेल्या दोन विभागांतील प्रत्येकी एका विषयावर म्हणजेच एकूण दोन विषयांवर निबंध लिहिणे अपेक्षित असते.  यापूर्वीच्या पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका उमेदवाराने नजरेखालून घातल्यास या पेपरचे अचूक स्वरूप लक्षात येते. यापूर्वीच्या विचारलेल्या प्रश्नावरून निबंधाचे विविध विषय लक्षात घ्यावे आणि परीक्षार्थ्याने स्वतःच्या सोयीसाठी त्याचे वर्गीकरण करावे. उदा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण, लोकशाहीची प्रासंगिकता, स्त्रियांचे समाजातील स्थान, तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर पडत असलेला दबाव. इ. अशा पद्धतीने वर्गीकरण केल्यावर त्या-त्या विषयाची व्यापक व सखोल माहिती,त्याचे परिणाम त्यावर उपाययोजना इ. माहितीची जमवाजमव व स्वतंत्र नोट्स काढाव्यात.

सामान्य अध्ययन :-

    पूर्व परीक्षेविषयी विस्तृत माहिती पाहतानाच यापूर्वीच्या लेखात आपण मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाविषयी सुतोवाच केले होते. सामान्य अध्ययन १ ते ४ या विषयांच्या व्यापकतेमुळेच या विषयाची अतिशय व्यापक तयारी आणि नियोजन करणे गरजेचे असते. यासंबंधी अभ्यासक्रमाविषयी विस्तृत माहिती आयोगाच्या वेबसाईटवर दिलेली आहेच. तसेच वैकल्पिक विषयाची निवडही काळजीपूर्वक करणे अत्यंत म्ह्ताचे असते.

अंतिम निवड:-

मुख्य परीक्षेतील निकालानंतर २७५ गुणांची मुलाखत आयोगामार्फत घेतली जाते. आपल्या आवडी निवडीसंबंधी योग्य बाबींचा अभ्यास करावा. उमेदवाराची अंतिम निवड लेखी मुख्य परीक्षेतील १७५० गुण आणि मुलाखतीतील २७५ गुण अशा एकूण २०२५ गुणांच्या आधारे केली जाते. प्रस्तुत लेखात अतुशय जुजबी माहिती देण्यात आली आहे. वाचकांनी गोंधळून न जाता आयोगाच्या वेबसाईटवरून अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती मिळवावी.

 संबंधित माहिती आवडली असल्यास इतरांना लिंक शेअर करा.