गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना |
Navinya Purna Yojna Maharashtra
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पशुपालन करावे, व पशुपालनाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचा एक वेगळा स्त्रोत निर्माण करावा. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असते. या Navinya Purna Yojna Maharashtra अंतर्गत पात्र व्यक्तींना गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना करिता यांचे गट वाटप करण्यात येत असते तसेच याकरिता अनुदान वितरित करण्यात येत असते.
![]() |
गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना |
#पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पशुपालन करावे, व पशुपालनाच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नाचा एक वेगळा स्त्रोत निर्माण करावा. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असते. या Navinya Purna Yojna Maharashtra अंतर्गत पात्र व्यक्तींना गाई म्हशी, शेळी मेंढी, कुक्कुट पालन योजना करिता यांचे गट वाटप करण्यात येत असते तसेच याकरिता अनुदान वितरित करण्यात येत असते. नाविन्यपूर्ण योजना 2022-23 करिता नवीन अर्ज सुरू झालेल्या असून नाविन्यपूर्ण योजना संदर्भात संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.
नाविन्यपूर्ण योजनेचे स्वरूप:
मित्रांनो नावीन्यपूर्ण योजना महाराष्ट्र (Navinya Purna Yojana Maharashtra)अंतर्गत खालील जनावरे तसेच पशूंचे गट वाटप करण्यात येत आहे.
1. शेळी मेंढीचा गट वाटप करणे यामध्ये दहा शेळ्या व एक बोकड तसेच दहा मेंढ्या
व एक मेंढा यांचा समावेश आहे.
2. दुधाळ गाई म्हशींचे वाटप करणे
3. कुक्कुटपालनामध्ये 1000 मांसल कुकुट पक्षी यांचे वाटप करणे.
4. तलंगाच्या 25
माद्या आणि 3 नर वाटप करणे.
अशा प्रकारच्या अनेक योजना या Navinya Purn Yojana महाराष्ट्र अंतर्गत राबविण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र अंतर्गत अनुदान किती मिळते?
मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत तुम्हाला कॅटेगिरी नुसार अनुदान मिळणार असून ते खालील प्रमाणे मिळणार आहे. Navinya Purna Yojna अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यास त्याला 75 टक्के अनुदान मिळते. नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अर्ज करणारा अर्जदार हा ओपन प्रवर्गातील असल्यास त्याला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे.
अशाप्रकारे या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत शेळी व मेंढी, गाय, म्हैस व कुक्कुटपालन याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे.
अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि.१३.१२.२०२२ रोजी दु. ३.०० वा. पासून ते दि.११.०१.२०२३ रोजी रा. १२.०० वा. पर्यंत राहील.
अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील. एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.
महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत.केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सन
२०२१-२२ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२-२३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.
सन २०२२-२३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
या योजने संदर्भातील ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या योजना विषयी माहिती करता या वेबसाईटवर नियमितपणे भेट देत राहा.
अर्ज करण्याकरिता संपर्क - 9021914311 (आपला अर्ज फक्त ऑनलाईन भरून मिळेल)
आपण आपली कागदपत्रे वरील नंबर वर Whatsapp करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी कृपया योजनानिहाय प्रतीक्षाधीन यादी पहावी. उपलब्ध अर्जांची संख्या आणि योजनानिहाय लक्षांक विचारात घेवून योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता पडताळून अर्जदारांनी अर्ज करावा.
अर्जदार
नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी
काही दिवसांची स्वतंत्र विंडो देण्यात येईल.
योजने अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी “QP-EVDTEC” या नावाने SMS
प्राप्त होतील. तसेच प्रणालीवर सूचनाही प्राप्त होतील.
योजने
अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.
योजने
संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.
कॉल
सेंटर संपर्क - १९६२ (१०AM to ६PM).
टोल
फ्री संपर्क -१८००२३३०४१८ (८AM to ८PM).
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.