आयटीआयचा शिक्का; ‘अग्निपथ’ प्रवेश पक्का
Agneepath scheme
Agneepath scheme: खासगी असो वा शासकीय, कोणत्याही आस्थापनामध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण असलेल्यांना कायम मागणी असते. भारतीय सैन्यदलदेखील यास अपवाद नाही. यापूर्वी, अगदी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कमांडंट खालील म्हणजेच वर्ग तीनच्या पदांसाठी जवान म्हणून भरती होण्याची संधी मिळत असे. यात आता शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी करण्यात आलेली आहे.

आयटीआयचा शिक्का; ‘अग्निपथ’ प्रवेश पक्का
भारतीय संरक्षण दलाकडून अग्निपथ योजनेंतर्गत जवान म्हणून अग्निवीरांची निवड केली जात असून, त्यांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. यात अन्य शैक्षणिक शाखांपेक्षा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना प्राधान्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भरती प्रक्रियेतील परीक्षेत ‘आयटीआय’ झालेल्यांना बोनस गुण दिले जात आहेत. यामुळे त्यांचा अग्निपथ योजनेतील प्रवेशमार्ग सुकर होत आहे.
खासगी असो वा शासकीय, कोणत्याही आस्थापनामध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण असलेल्यांना कायम मागणी असते. भारतीय सैन्यदलदेखील यास अपवाद नाही. यापूर्वी, अगदी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कमांडंटखालील म्हणजेच वर्ग तीनच्या पदांसाठी जवान म्हणून भरती होण्याची संधी मिळत असे. यात आता शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी करण्यात आलेली आहे. मात्र, यंदापासून सुरू झालेल्या चार वर्षांसाठी असलेल्या अग्निपथ योजनेत शासकीय संस्थांमधून ‘आयटीआय’ पूर्ण केलेल्या तरुणांना प्राधान्य मिळण्याची चिन्हे आहेत. तशी शैक्षणिक तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.
- अग्निपथ योजनेच्या तांत्रिक वर्गवारीमध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थींना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- यासंदर्भात केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षण महानिदेशालयाच्या (डीजीटी) सूचना
- देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह राज्यांच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागांना ‘डीजीटी’कडून पत्र
- शासकीय ‘आयटीआय’मधून एक व दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या किंवा अभियांत्रिकीची पदविका (डिप्लोमा) झालेल्या तरुणांना लाभ
विशेष तरतूद कशासाठी?
अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यदलामध्ये चार वर्षांसाठी घेतलेल्या जाणाऱ्या तरुणांना सीमेवर सुरक्षा म्हणून जबाबदारी मिळेलही. याशिवाय केशकर्तनापासून प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, फिटर अशा अन्य कामांसाठीही मनुष्यबळ लागणार आहे. यापूर्वी, दहावी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लष्करी प्रशासनाकडून ‘आयटीआय’शी संबंधित प्रशिक्षण दिले जात असे. आता मात्र अग्निवीर म्हणून घेतल्या जाणाऱ्या तरुणांमध्ये आयटीआय झालेल्यांची संख्या अधिक असावी, जेणेकरून असे व्यवसाय शिक्षण देण्याची गरज भासणार नाही, असा लष्कराचा हेतू आहे.
बोनस गुणांचा लाभ असा
- एक वर्ष आयटीआय : ३० गुण
- दोन वर्षे आयटीआय : ४० गुण
- पदविका (डिप्लोमा) : ५० गुण
अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.
0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. खाली कमेंट मध्ये आपला वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक किंवा आपली वेईयाक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही फक्त आमच्यापर्यंत आलेली माहिती आपणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. सदर जाहिरातीमध्ये काही त्रुटी आढळल्यास नक्की आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही इतरांपर्यंत योग्य व बरोबर माहिती पोहोचवू.